मरण किती सोप वाटतय ना रे?
काढल्या नळ्या, झाल सर्व शांत
अरे, माझी तडफड तो निर्णय घेताना
कासाविस झालेला जीव कोणाला सांगू रे?
आईच्या पदराला घट्ट धरलेला हात
सोडवलास सहजतेने
तुझा खूप राग आला होता
तेव्हा वाटल वाईट्ट बाबा माझा
दिलस गुलाबाच फुल हातात माझ्या
म्हणलास जपून ठेव,
हीच आई तुझी आता
माझा आर्त चेहेरा कळला का रे?
आता तुही गेलास, मला सोडुन
गुलाबाच कोणतं फुल ठेवायच सांग ना?
लोक बसलेत म्हणायला धीर ठेवा
त्यांना आपल तुपल कस रे समजवायच?
सगळ्यांना दिसल्यात नितळ काचा,
ती तावदान, आणि ताजमहालासारखा
शुभ्र संगमरवर
माझं मन, वेदना कोणाला..............
जाऊ दे बाबा तुला तरी कुठे दिसल्या रे?
- सो्नाली
No comments:
Post a Comment